E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लिची फळाचा हंगाम बहरला
Wrutuja pandharpure
18 May 2025
पश्चिम बंगालमधून बाजारात आवक
पुणे
: आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या लालचुटूक लिचीचा हंगाम बहरला आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात पश्चिम बंगालमधून लिचीची आवक होत आहे. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात दर अधिक आहेत. येत्या काळात दरात काही प्रमाणात घट होईल, अशी माहिती व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली.
परदेशी म्हणाले, लिचीची लागवड पश्चिम बंगालमधील कोलकाता, बिहारमधील मुझ्झफरपूर, तसेच पंजाबमधील पठाणकोट परिसरात केली जाते. आंबट-गोड चव असलेल्या लिचीचा हंगाम दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो. जुलै महिन्यापर्यंत हंगाम सुरू असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर हंगामाची अखेर होते. सद्य:स्थितीत बाजारात रोज १२०० ते १५०० बॉक्सची आवक होत आहे. पुढील आठवड्यात आवक दुप्पटीने म्हणजे ३.५ ते ४ हजार पेटीपर्यंत होईल. त्यावेळी दरातही काही प्रमाणात घट होऊ शकते.
हंगामाच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता परिसरातून लिचीची आवक सुरू झाली आहे. सध्या लिचीचे दर अधिक आहेत. घाऊक बाजारात लिचीच्या नऊ किलो पेटीचा दर प्रतवारीनुसार १८०० ते २७०० रुपये आहे. तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर ३५० ते ४०० रूपये आहे. २० मे नंतर बिहारमधील मुझ्झफरपूर परिसरातून लिचीची आवक सुरू होईल. बिहार, तसेच पश्चिम बंगालमधील लिची बाजारात आल्यानंतर दर कमी होतील. येत्या काही दिवसांत लिचीची गोडी वाढेल. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पंजाबमधील पठाणकोट परिसरातून लिचीची आवक सुरू होईल. जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर लिचीचा हंगाम संपेल, असे परदेशी यांनी नमूद केले.
लिची नाशवंत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील लिची विमानाने पाठविण्यात येत आहे. विमानाचे भाडे जास्त असल्याने लिचीचे दर तेजीत आहेत. ट्रकमधून लिचीची आवक बाजारात होते. लिची खराब होऊ नये म्हणून त्याला शेतकरी थर्माकोलची पेटी वापरतात. उष्णतेत लिची लवकर खराब होते. किरकोळ बाजारातील व्यापार्यांकडून लिचीला मागणी वाढली असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
आठवडाभरात दुप्पट आवक
सद्य:स्थितीत लिचीची आवक कमी आहे. त्यामुळे दरही अधिक आहेत. मात्र येत्या आठवडाभरात आवक दुप्पटीने वाढणार आहे. रोज ३.५ ते ४ हजार बॉक्सची आवक होईल. त्यावेळी दरातही घट होईल. बाजारात दाखल होत असलेल्या फळांचा दर्जा चांगला आहे. चवही उत्तम आहे, त्यामुळे लिचीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. जुलै महिन्यात लिचीचा हंगाम संपत असतो.
- राजेश परदेशी, व्यापारी मार्केटयार्ड.
Related
Articles
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी